कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू व्हावा यासाठी खासदार धैर्यशील माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, नगरसेवक रवी माने यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील व्यापाराचे अर्थ चक्र सुरू राहिले पाहिजे, तरच राज्याचा महसूल सुरळीत राहील असे सांगितले. मात्र त्याच वेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वयंशिस्त पालन सुद्धा आवश्यक असल्याचे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरु करण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला जाईल व त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
खासदार धैर्यशील माने यांनी व्यापाऱ्यांची स्थिती बिकट असल्याचे सांगून तीन महिने व्यापार बंद राहिल्याने व्यापाऱ्यांच्या समोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे व्यापार तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पॉझिटिव्हिटी चा रेट 10 टक्के पेक्षा कमी असल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर अशा सर्व ठिकाणी व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड रेट्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सलग दीर्घकालीन लाभ डाऊन मुळे माळ खराब होणे तसेच कामगार पगार,बँक व्याज, दुकान भाडे इत्यादी खर्चामुळे व्यापारी अडचणीत आला आहे त्याला दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची मागणी योग्य असल्याचे सांगून यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बैठकीस मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष सिंग, मिलिंद नार्वेकर, डॉक्टर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.