कोल्हापूर (प्रतिनिधी)- पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज संपर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूलच्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अमानवी हिंसाचार सुरु केला आहे. याच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या घराच्या दारात, अंगणात निदर्शने करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीनगर येथील निवासस्थानी दारामध्ये निषेधाचे फलक हाती धरून निषेधाच्या घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा जाहीर निषेध केला.
‘बंगाल की गलीया सुनी है…ममता बानो खुनी है’
‘बंगला जल रहा है …हिंदू मर रहा है’
कधी थांबणार पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांवरील खुनशी अत्याचार ?
भाजपा पक्ष पश्चिम बंगालमधील सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीशी.
कधी थांबणार पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांवरील खुनशी अत्याचार ?
राक्षसी अत्याचार सुरु असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय संविधान लागू आहे की नाही ?
अशा घोषणा देत निषेधाचे फलक दर्शवले.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ज्यांची लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे. तेच राज्यकर्ते हिंसा करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केले त्या मुल्यांमध्ये न बसणारे अमानवी कृत्य करून तृणमुलचे त्याठिकाणी अराजकता माजवत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील भाजपा कार्यकर्त्यांना आजच्या आंदोलनातून आम्ही विश्वास देत आहोत कि, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पश्चिम बंगाल मधील हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या अशा सर्वांना पुन्हा उभा करण्याचे काम भारतीय जनता पार्टी निश्चित करणार असल्याचे सांगितले. ममता दीदीच्या दादागिरी पुढे भाजपा कार्यकर्ता झुकणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे सर्व प्रथम ध्येय हे राष्ट्र असून असल्या अमानवी हिंसेपासून देशाला वाचवण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे.
आजच्या आंदोलनात महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, डॉ.राजवर्धन, संतोष माळी, भरत काळे, विवेक कुलकर्णी, अशिष कपडेकर, सचिन तोडकर, गायत्री राउत, अजित ठाणेकर, राजू मोरे, संजय सावंत, अभिजित शिंदे, अतुल चव्हाण, बापू राणे, इकबाल हकीम, नजीर देसाई, विराज चिखलीकर, धीरज पाटील, गिरीष साळोखे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी आपआपल्या दारातून हि निदर्शने केली.