गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे.
तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कारण १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे.
परंतु जर का हेच रीडिंग लेट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील. म्हणजेच साधारण ७.६० रुपयांनी हे बिल आपल्याला भरावे लागेल. हेच युनिट जरा का ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील.
आपला निष्काळजी पणा आपल्या खिशाला कात्री लावू शकतो. जर का रीडिंग घेणार व्यक्ती लेट येत असेल तर आपले बिल हे वाढून आलेच समजा आणि याला जबाबदार आपण असाल. त्यामुळे त्या व्यक्तीला वठणीवर आणण्याचे काम हे आपले आहे; तर आपले बिल हे योग्य येईल आणि आपल्याला वाढीव भुर्दंड बसणार नाही.
जर का काही कारणास्तव आपल्या भागातील ट्रान्सफॉर्मर बिघडला असल्यास २४ तासाच्या आत तो दुरुस्त करणे ही जबाबदारी वीज कंपनीची असते अन्यथा हा ट्रान्सफॉर्मर २४ तासाच्या आत दुरुस्त नाही झाला तर प्रति तास ५० रुपये भरपाई ग्राहकास मिळते, आणि हा आपला हक्क आहे.
तसेच विजेच्या खांबापासून ते आपल्या मीटर पर्यंत जी काही वायर लागेल त्याचा खर्च हा सर्व MSEB कडे असतो. वीज ग्राहक अटी व शर्तीनुसार हा खर्च एखाद्या ग्राहकाने केल्यास त्या पावतीच्या आधारे केलेला खर्च आपल्याला परत मिळतो, आणि हा आपला अधिकार आहे, तसेच नवीन वीज कनेक्शनला लागणारे पैसे घरगुती रु. १५००ते रु. २००० व क्रुषी पंप रु. ५००० पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.
तसेच जर का आपल्या मीटरचा फोटो ना काढता जर आपल्याला अंदाजे लाईट बिल आले, तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तसेच जर आपले वीज बिल काही कारणास्तव थकले असेल आणि जर एखाद्य कंपनीला आपला वीज पुरवठा बंद करायचा असेल तर एक महिना आधी आपल्याला स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
तसेच एखाद्याचे शेत असेल आणि त्याचे घर जर शेतात असेल तर त्याला दिवसा आणि रात्रीसुद्धा वीज असणे अनिवार्य आहे, तसेच आपल्या शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई म्हणजेच भाडे मिळते, विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५ नुसार जिल्हा न्यायदं डाधिकारी आपल्याला विहित भरपाई देण्यास सक्षम असतात.
जर आपल्याला भाडं मिळत नसेल तर आपण त्याच्याकडे दाद मागू शकतो, तसेच जर काही चुकीमुळे एकदा व्यक्ती मेला किंवा जखमी झाला, तर त्यांना ५ ते १० लाख भरपाई देण्याची जबाबदारी ही जिल्हा न्यायदंडाधिकारी याची असते.
त्यामुळे आपण आपले हक्क जाणून घ्या, आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा.