मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मिळाल्यानंतर केतकीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये तिला जामीन मंजूर झाला. केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिच्या नव्या विधानांमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या सोबत घडलेल्या घटनेचा अनुभव एका वृत्त वाहिनीला सांगितलं आहे. तिने माध्यमांशी बोलतांना धक्कादायक खुलासे केले आहे.
‘एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो एवढा मोठा गुन्हा होतो का की तुम्ही एकाला तुरुंगात टाकता, ४१ दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता?’ असा थेट प्रश्नही केतकीने यावेळी विचारला आहे.
ती पुढे म्हणते,’सुरुवातीला मला बेकायदेशीररित्या घरातून नेण्यात आले. त्यानंतर बेकायदेशिररित्या अरेस्ट वॉरंट अन् नोटिसशिवाय जेलमध्ये टाकण्यात आले. मला अर्ध्या तासाचीही नोटीस दिली गेली नाही, थेट पोलीस घरी आले आणि मला उचलून घेऊन गेले. हा देखील गुन्हाच आहे.’ ती पुढे म्हणते, ‘माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला.’ असं म्हणत तिने पोलिसांवर आरोप केला आहे. ती पुढे म्हणाली मी साडी मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातला त्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग होतोय….’ तरीही एवढं होऊनही तिच्या अंगावर केमिकल रंग आणि अंडं फेकण्यात आलं’ असं म्हणत तिने आपला अनुभव सांगितला