Kesari Chapter 2 | Akshay Kumar : ‘केसरी २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याची पहिली पोस्ट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, अभिनेत्याने केवळ त्याचे मन मोकळे केले नाही तर चित्रपटाबद्दलच्या त्याच्या भावनाही व्यक्त केल्या. तसेच, चित्रपटाचे काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.
अभिनेत्याने लिहिले की, ‘तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील पण हे एक वादळ आहे.’ सी. शंकरन नायर यांच्या या कथेने मला धक्का बसला कारण आम्हाला माहित नव्हते की जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एका व्यक्तीने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला न्यायालयात खेचले होते आणि गुडघे टेकले होते.
View this post on Instagram
‘मी केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट फक्त एक कलाकार म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून करत आहे. हा फक्त एक चित्रपट नाही… तो एक अपूर्ण वृत्तांत आहे, तो एक वेदनादायक स्मृती आहे… आणि शेवटी.. तो न्याय आहे. केसरी चॅप्टर २ आता तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात”. अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.
दरम्यान, नुकतंच मुंबईत चित्रपट कलाकारांसाठी सिनेमाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सर्व बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. हा चित्रपट थिएटरमध्ये येताच त्याच्यावर टीका होऊ लागली. तर, अभिनेत्याचे चाहते त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट करण सिंह त्यागी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये येताच लोक सोशल मीडियावर त्यांचे रिव्ह्यू शेअर करत आहेत.