थिरूवनंतपुरम: मान्सुनच्या पावसाचा केरळातील धुमाकुळ सुरूच असून त्या राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती उद्भवली आहे. केरळात या पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या 67 झाली असून राज्यातील दोन लाख 27 हजार लोकांना विस्थापित करावे लागले आहे. कोझीकोडे येथे सात जण आणि वायनाड मध्ये एक जण आज पुरामुळे दगावल्याने ही स्थिती उद्भवली आहे. वायनाड येथे पुरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या छावणीला कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज भेट दिली. त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजाऊन घेतल्या. त्यांनी दरडी कोसळलेल्या कवलाप्पारा गावालाही भेट दिली. तेथे 65 जण दरडींखाली जीवंत गाडले गेले असल्याची आशंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तेथील अकरा मृतदेह आत्तापर्यंत हाती लागले आहेत.