थिरुवनंतपूरम, दि. 19- केरळमधील थिरुवनंतपूरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी उद्योगसमूहाला चालवायला देण्यावरुन केरळमध्ये मोठे वादाचे मोहोळ उमटले होते. केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे हा विमानतळ चालवण्यासाठी अदानी उद्योगसमूहाला कंत्राट दिले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीतील हा विमानतळ एका खासगी कंपनीला चालवायला देण्यावरुन केरळमध्ये वाद निर्माण झाला होता.
ऑगस्ट 2020 मध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांची एक सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्राच्या या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार एक याचिकाही त्वरेने केरळ राज्य सरकारतएफे अदानी उद्योग समूहाविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
दि. 19 ऑक्टोबर रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता, केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, हा केरळ सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी, या विमानतळाच्या देखभाल आणि कार्यान्वन करण्यासाठी केरळ सरकारतर्फे एका स्पेशल परपज व्हेईकलची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली होती. या एसपीव्हीतर्फे विमानतळ संचालनासाठी निविदा भरण्यात आली होती. मात्र, प्रती प्रवासी रु. 16 च्या फरकाने ही निविदा अदानी उद्योगसमूहाला देण्यात आली होती.
या निविदा प्रक्रियेमध्ये तिसरी कंपनी जीएमआर ग्रुप होती. मात्र. केरळ उच्च न्यायालयाने केरळ सरकारची याचिका फेटाळल्याने केरळ सरकारला धक्का बसल्याचे मानले जात आहे.