नवी दिल्ली – ज्या ठिकाणी कॉंग्रेसची भाजपशी थेट लढत आहे अशा ठिकाणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे प्रचाराला जात नाहीत असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश अशा ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे पण त्या राज्यात राहुल आणि प्रियांका प्रचाराला का गेले नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आजपासून प्रियांका गांधी या दिल्लीतील विविध मतदार संघांतील प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. पण त्यांनी येथे येऊन वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही त्याऐवजी त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान अशा राज्यांतील प्रचाराला जावे अशी सूचना केजरीवालांनी केली आहे. ते म्हणाले की हे भाऊ बहिण उत्तरप्रदेशात सपा, बसपाच्या विरोधात प्रचाराला जातात. दिल्लीत ते आम आदमी पक्षाच्या विरोधात प्रचाराला येतात. पण त्यांची थेट भाजपशीच कट्टर लढत आहे अशा राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मात्र ते प्रचाराला जात नाहीत याचे कारण समजले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.