दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यातील ओखला, जामिया, न्यू फ्रेंड्स कॉलनी, मदनपूर खादर परिसरातील सर्व सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने काल संध्याकाळी घेतला. मनीष सिसोदिया यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, दिल्लीच्या ढासळत्या कायदाप्रणालीबद्दल मला खूप चिंता आहे. दिल्लीत त्वरित शांतता प्रस्थापित झाली पाहिजे – यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची वेळ घेण्यात आली आहे.
दिल्ली की बिगड़ी क़ानून व्यवस्था को लेकर मैं बहुत चिंतित हूँ। दिल्ली में तुरंत शांति बहाल की जाए- इसके लिए गृह मंत्री अमित शाह जी से मिलने का समय माँगा है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 16, 2019
रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदवणारे विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत बरेच विद्यार्थी आणि पोलिसही जखमी झाले.