नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झोपडपट्टीवासीयांसाठी ‘मुख्यमंत्री आवास योजना’ सुरू केली आहे. ते म्हणाले की आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला पक्की घरे देईल.
झोपडपट्टीत राहणाऱ्या 65,000 कुटुंबांना मंगळवारी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच सर्वाना पक्की घरे दिली जातील असा दावा त्यांनी केला .
यावेळी केजरीवाल म्हणाले की, गेल्या 70 वर्षात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही सरकारने काहीही केले नाही. झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की घरे बांधण्याची जबाबदारी दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्डाला देण्यात आली आहे.
मंडळाने यावर्षी जूनमध्ये पक्की घरे लाभार्थ्यांची संख्या जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते. ज्यामध्ये आतापर्यंत 65,000 कुटुंबांची नोंद झाली आहे. केजरीवाल म्हणाले, “आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे.” दिल्ली सरकारच्या सर्वेक्षणात झोपडपट्टी रहिवाशांना पक्की घरे मिळतील.