मुंबई – राज्यात महविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र अनेक कारणांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध दर्शविला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी काय केले हे आम्हाला कुणी सांगू नये. सावरकरांनी आयुष्याची 14 वर्षे अंदमानच्या तुरुंगात होते. नंतर ते बाहेर आले. जे लोक त्यांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करतात, ते कुणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो या सर्वांना दोन दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मग त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला, संघर्ष केला आणि बलिदान दिलं हे कळेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
Sanjay Raut,Shiv Sena: Those who oppose Veer Savarkar, they maybe from any ideology or party, let them stay for just two days at the cell in Andaman cellular jail where Savarkar was lodged.Only then will they realize his sacrifice and his contribution to the nation pic.twitter.com/8J749b5dF4
— ANI (@ANI) January 18, 2020
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती हा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही. त्यामुळे असं असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास आमचा त्याला विरोध असेल. सावरकर यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं आणि विवादास्पद होतं. त्यांच्याबद्दल चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी बोलल्या जातात. काँग्रेसला सावरकरांची जी गोष्ट चुकीची वाटते ती आम्ही बोलत राहू, असे त्यांनी सांगितले आहे.