नवी दिल्ली : देशात करूनच कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण गेल्या 24 तासांत 18 हजार 738 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सध्या भारतात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय करोना रुग्ण आहेत. देशात 18 हजार 558 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 84 हजार 110 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/JPG1VPNFHX pic.twitter.com/1GQHwsN2Ps
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 7, 2022
सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 5.02 टक्के आहे.
महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 1931 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 1953 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहे. यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 272 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 234 वर गेली आहे.