जम्मूच्या राज्यपालांचे राजकीय पक्षांना आवाहन
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील सध्याचे वातावरण पाहता इथे काही तरी मोठे घडणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. त्यातच जम्मू -काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील राजकिय पक्षांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मलिक यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रातिनिधीक मंडळाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
The J&K Governor said a pure security measure is being mixed up with issues with which it has no connection & requested the political leaders to ask their supporters not to mix up matters, to maintain calm & not believe exaggerated rumours being circulated all around. https://t.co/wUhPEEP2Vl
— ANI (@ANI) August 2, 2019
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजकीय नेत्यांना आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. या प्रातिनिधीक मंडळामध्ये पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे प्रमुख शाह फैसल आणि पीपल्स कॉंफ्रेंसचे नेता सज्जाद लोन यांचा समावेश होता. दरम्यान, या मंडळाने राज्यपालांना घाटीतील आणि जम्म-काश्मीरच्या सर्व जनतेमध्ये सध्याच्या वातावरणामुळे भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे राज्यपालांना सांगितले. त्यावरच राज्यपालांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगण्याचेही म्हटले.