मुंबई – बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती.’ हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. सध्या हा कार्यक्रम चांगलाच चर्चेमध्ये आहे. टीआरपी यादीमध्ये हा शो टॉपमध्ये असल्याचे पहायला मिळतेय. 18 ऑक्टोबरला झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला एक्सपर्ट सल्ला ही लाइफलाइन घ्यावी लागली मात्र तरीही त्यांना हार पत्करावी लागल्याचे दिसत आहे.
छत्तीसगढचे जालिम साय असे त्या स्पर्धकाचे नाव आहे. १२ लाख पन्नास हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी एक्सपर्ट सल्ला ही लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र जालिम यांना प्रश्नाचे अचूक उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांना सहा लाख चाळीस हजार रुपयांवर हार मानावी लागली.
दरम्यान, बारा लाख पन्नास हजारांसाठी जालिम यांना ‘सर्वाधिक सिने गीत लिहिण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘A- गुलजार, B- जावेद अख्तर, C- समीर आणि D- अंजान’ असे पर्याय देण्यात आले होते. जालिम यांनी एक्सपर्ट राहुल देव यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा ‘मला ज्या विषयाची सर्वात जास्त भीता वाटते ते म्हणजे मनोरंजन. पण या प्रश्नाचे अचूक उत्तर गुलजार असावे हा माझा अंदाज आहे’ असे ते म्हणाले.
प्रश्नाचे योग्य उत्तर ठाकून नसल्याने जालिम यांनी खेळ सोडावा असे मत राहुल यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे जालीम यांनी तिथेच खेळ सोडला आणि त्यांना 6 लाख चाळीस हजारांवर हार मानावी लागली.
या प्रश्नाचे उत्तर एका विशेष वेळेमध्ये कोणीही देऊ शकत नाही असे म्हटले जात आहे. कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पाहता सर्वांनाच गुलजार हे उत्तर योग्य असल्याचे वाटेल. पण समीर आणि अंजान या दोन नावांमध्ये देखील गोंधळ होऊ शकतो. कारण गीतकार समीर त्यांचे पूर्ण नाव समीर अंजान असे लिहीतात.