नवी दिल्ली: केंद्र सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरण स्वत:च्या नियंत्रणात घ्यावे त्याद्वारे त्यांनी या लवादाच्या आदेशानुसार पाणी वाटप करावे आणि लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी अद्रमुक पक्षाने केली आहे.
तामिळनाडुत सध्या प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्या विषयी या पक्षाच्या विजला सत्यनाथ यांनी शुन्य प्रहरात हा विषय उपस्थित केला. त्या म्हणाल्या की कावेरी नदीच्या पाणी वाटपाबाबत या लवादाने जो निर्णय दिला आहे त्याची जशीच्या तशी त्वरीत अंमलबजावणी केली जावी. त्यासाठी केंद्र सरकारनेच आता हस्तक्षेप करून कावेरी प्राधिकरण स्वताच्या ताब्यात घ्यावे अशी सुचना त्यांनी केली. गोदावरी नदी कावेरीला जोडण्याचा प्रकल्प वेगाने मार्गी लावावा त्यातून गोदावरीचे तीनशे टीमएमसी पाणी अन्य भागाला मिळू शकते असे त्या म्हणाल्या.