मुंबई – ‘कोण बनेगा करोडपती’ हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. मनोरंजनासोबत ज्ञानात भर पाडणार हा शो बिग बी अर्थात अमिताभ बच्चन होस्ट करतात. लवकरच केबीसीच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आजपर्यंत सर्वाधिक टीआरपीमध्ये या शोची गणना केली जाते. शोबाबतच्या नव्या पर्वाची तयारी पूर्ण झाली असून त्याचे प्रोमो देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र शोच्या दिगदर्शकाने अमिताभ बच्चन यांनी ठेवलेल्या अटींबाबत खुलासा केला आहे.
कोण बनेगा करोडपतीचे दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना या सिझनबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.विशेष म्हणजे अमिताभ यांनी हा शो करताना आमच्यासमोर काही अटी ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की अमिताभ बच्चन यांनी हा कार्यक्रम प्रोफेशनल पद्धतीने चालवण्यात यावा अशी मागणी केली होती.
अमिताभ यांच्या या मागीणीनंतर प्रचंड दबाव आल्याचेही दिग्दर्शक अरुण यांनी सांगितले. केबीसीची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तुम्हाला डान्स येणे किंवा गाणे गाता येणे आवश्यक नाही तर तुम्ही काय वाचल आहे लिहिलं आहे तुमचा अभ्यास काय आहे हे महत्वाचे असल्याचे दिगदर्शक अरुण यांनी सागितले. केबीसीचा नवीन सीजन याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.