काटेवाडी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधी करिता हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत असल्याबाबत सर्व जनतेमध्ये जनजागृती व्हावी याबाबत श्री. छत्रपती हायस्कूल काटेवाडी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी काटेवाडी शाळेपासून ते संपूर्ण गावांमध्ये “भारत माता की जय, अशाप्रकारे घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली.
सर्वांना देशाबद्दल प्रेम आहे. तरीदेखील भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आसल्यामुळे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला असल्याने, भारताचा अभिमान, आपल्या देशाचा अभिमान प्रत्येकालाच असल्याने प्रत्येकाने आपल्या घरावर भारताचा झेंडा लावावा यासाठीच या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावातून प्रभात फेरी काढली.