श्रीनगर – काश्मीर मधील युवकांनी दहशतवादाकडे पाठ फिरवली असून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या विविध दहशतवादी संघटनांबाबत त्यांचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला हा एक मोठाच धक्का मानला जातो गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 अखेरीपर्यंत काश्मीर मधील 135 युवक विविध दहशतवादी संघटनामध्ये सामील झाले होते पण वर्षभराचा कालावधीमध्ये म्हणजेच ऑगस्ट 2021 अखेरीपर्यंत फक्त 80 युवकांनी दहशतवादी संघटनेचा आसरा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे.
अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांनी सरकार स्थापन केल्यानंतर तालिबान्यांचे लक्ष काश्मीर वरही आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरमधील आपल्या कारवाया वाढवण्याचा धोका समोर आला असतानाच काश्मीरमधील ज्या स्थानिक युवकांची पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना मदत होत होती. त्या युवकांनी आता या संघटनांकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे .
आतापर्यंत पाकिस्तानात प्रशिक्षित घेतलेले दहशतवादी काश्मीरच्या भूमीवर पाठवुन दहशतवादी कारवाया करण्यास पाकिस्तान प्राधान्य देत होता पण गेल्या काही दिवसांमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांची भारतातील घुसखोरी जवळजवळ बंद झाल्याने स्थानिक युवकांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देऊन दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडण्याचा डाव पाकिस्तानने रचला होता पण गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पाकिस्तानी युवकांनी पाकिस्तानच्या हा डाव सफल होऊन दिलेला नाही.
युवकांना आकर्षण वाटावे म्हणून पाकिस्तानने जम्मू-काश्मीर रेजिस्टन्स फोर्स नावाच्या एका नवीन संघटनेची स्थापना ही केली होती पण या संघटनेकडे ही काश्मीर युवकांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे काश्मीर ला लागू असलेले कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर काही काळ जरी तेथे अस्वस्थता निर्माण होऊन काश्मिरी युवक दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झाला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत मात्र हे आकर्षण कमी झाले आहे आणि खूपच कमी प्रमाणात युवक विविध दहशतवादी संघटनामध्ये सहभागी होऊ लागले आहेत.