Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

दिल्ली वार्ता- काश्‍मीर: 70 वर्षांच्या दुःखाचा अंत

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2019 | 7:00 am
A A
…म्हणून अजूनही जम्मू काश्‍मीरमध्ये फडकतोय लाल झेंडा

वंदना बर्वे

भारताच्या इतिहासात ऑगस्ट महिन्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. 1942 पासून 9 ऑगस्ट हा दिवस क्रांतिदिन म्हणून पाळला जातो. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन आहे आणि इतिहासाच्या या अखंड शृंखलेत आता 5 ऑगस्टची भर पडली आहे. कारण, याच तारखेला भारताचा स्वर्ग म्हणजे काश्‍मीर खऱ्या अर्थाने भारताचे अविभाज्य अंग बनले.

आतापर्यंत काश्‍मीरमध्ये दोन घटना, दोन झंडे आणि दोन व्यवस्था अस्तित्वात होत्या. परंतु, आता काश्‍मीर भारताशी एकजीव झाला आहे. 70 वर्षांचा संघर्ष आणि
दुःखाची परिणती काश्‍मीरचे भारतमय होण्याने झाली आहे. मात्र, यासाठी जो संघर्ष करावा लागला तोही कमी दुःखदायक नाही. याच दिवसासाठी आपले हजारो जवान काश्‍मीरमध्ये शहीद झाले आहेत, हे विसरून चालणार नाही.

खरंच बोलायचं झालं तर, मागील 70 वर्षांत काश्‍मीरचा काहीही विकास झाला नाही. फुटीरतावाद आणि दहशतवादामुळे काश्‍मीरवासीयांचा एकही दिवस सुखाचा गेला नाही. एकीकडे पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचे काम करीत आहे तर दुसरीकडून चीनही आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे. काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे असं आपण म्हणत आलो असलो तरी काश्‍मीरचा 55 टक्‍के एवढाच भाग भारताच्या ताब्यात आहे. यात जम्मू, काश्‍मीर आणि लडाखचा समावेश होतो. पाकिस्तानने 30 टक्‍के जागेवर कब्जा करून ठेवला आहे. यात पाक अधिकृत काश्‍मीर, गिलगीट आणि बलुचीस्तानचा समावेश होतो. तर, 15 टक्‍के भूभाग चीनच्या ताब्यात आहे. यात शख्सगाम आणि अक्‍साईचा समावेश होतो. मुळात, काश्‍मीर ही सुफीसंत आणि ऋषीमुनींचा प्रदेश होय. येथे सैय्यद अली हमदानी, मीर मोहम्मद हमदानी, सैय्यद बुलबुल शाह, वली नंदऋषी, जनकऋषींची ही भूमी.

याशिवाय महिला सुफी संतांच्या पायधुळीने ही भूमी पवित्र झाली आहे. जसे देहात बिबी, बेहात बिबी, शाम वेद, लाल वेद, संगा बिबी, साला बिबी आणि गंगा बिबीचे नाव प्रामुख्याने घेता येईल. मात्र, 1989 मध्ये पाकिस्तानची कुदृष्टी काश्‍मीरवर पडली आणि तेव्हापासून दहशतवाद्यांनी या स्वर्गाचा नरक करून ठेवला आहे. गेल्या 70 वर्षांत जवळपास 48 हजार सैनिक आणि नागरिकांचा जीव दहशतवाद्यांनी घेतला. यात राजकीय पक्षांचे कार्यकर्तेसुद्धा आलेत.

सतराव्या लोकसभेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऐतिहासिक काम झालं आहे. यामुळे सरकारच्या अंगात बारा हत्तींचं बळ असं काही संचारलं की 26 जुलै रोजी संपणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी 7 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला. काश्‍मीरला कलम 370 मधून मुक्‍त करणारे विधेयक ससंदेच्या पटलावर ठेवण्यापूर्वी सरकारने सुरक्षेच्यादृष्टीने अभेद्य सुरक्षा व्यवस्था केली होती. ज्यांच्याकडून त्रास होऊ शकतो त्या तत्त्वांचा आधीच बंदोबस्त करण्यात आला.

व्होटबॅंकेच्या राजकारणाने मागील सहा-सातदशकात काश्‍मीरची कशी अवस्था झाली, याची जाणीव सर्वांना आहे. एकीकडे, काश्‍मिरातील राजकीय पक्षांचे फुटीरवादी नेते तरुणांच्या हातात दगड देतात. शाळा-कॉलेज, हॉस्पिटल बंद पाडतात. तर दुसरीकडे, याच फुटीरवादी नेत्यांची मुलं परदेशात शिकायला जातात. मोठ्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करतात आणि स्वर्गीय सुखाचं आयुष्य जगतात. याउलट, याच नेत्यांनी काश्‍मिरातील तरुणांना अशिक्षित ठेवण्याचा घाट घातला. याची रितसर माहिती गृह मंत्रालयाने उघड केली आहे.

काश्‍मीरचा प्रश्‍न कायमचा सुटावा अशी सव्वाशे कोटी भारतीयांची इच्छा सुरुवातीपासून होती. मात्र, काश्‍मीरचा प्रश्‍न केवळ कलम 370 आणि 35 अ हटवून सुटणार नाही. यासाठी काश्‍मीरचे विभाजन करावे लागेल असा सल्ला संघाच्या नेत्यांनी 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच दिला होता. याच गोष्टीची अंमलबजावणीची तयारी होती ही बाब नंतर सर्वांच्या लक्षात आली.

खरं म्हणजे, गृह खात्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे नसती तर कदाचित कलम 370 रद्द करून जम्मू-काश्‍मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकला नसता. कारण, मोदी सरकारच्या पहिल्या काळात राजनाथ सिंह गृहमंत्री होते. त्यांचा कल “सलोखा राखण्या’कडे होता. आमच्यासाठी जम्मू-काश्‍मीर हा अतिशय गंभीर विषय आहे. अनुच्छेद 370 मुळे या राज्याचा विकास होत असेल, तर ती तरतूद कायम ठेवायला आमची काहीही हरकत नाही, असं विधान 2014 साली भाजपचे अध्यक्ष असलेल्या सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये केलं होतं.

काश्‍मीरबाबतचा निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या कामात सरकारच्या नऊ अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. याशिवाय काश्‍मीरचे नवनियुक्‍त मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांचीही भूमिका महत्त्वाची होती. कलम 370 संबंधीची घोषणा झाल्यावर प्रशासकीय पातळीवरची परिस्थिती कशी हाताळायची, याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत अमित शहा यांच्या दिमतीला गृह सचिव राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक होते. रॉचे प्रमुख सामंत गोयल, गृह सचिव राजीव गौबा आणि आर्मी प्रमुख विपीन राव यांनी कलम 370 हटविण्याच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.

विधेयक सादर करण्यापूर्वी 47 बैठका झाल्या असल्याची चर्चा आहे. काश्‍मीरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची माहिती दररोज पीएमओ, गृह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांना पाठविली जात होती. शिवाय गृहमंत्रालय राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी सतत संपर्कात होते. या सर्वांचा परिपाक असा झाला की, काश्‍मीर भारताशी कायमस्वरूपी जोडला गेला.

Tags: .editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

5 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

5 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

5 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: .editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!