श्रीनगर : जम्मू काश्मिर आणि पाकिस्तानातून पाच ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या काळात 144 मुलांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी बहुतांश मुलांन त्याच दिशी अथवा थोड्या काळाने सोडण्यात आले. त्यापैकी सर्वात लहान हा नऊ वर्षाचा होता, अशी माहिती हाती येत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या तेव्हा म्हणजे पाच ऑगस्टपासून ताब्यात घेतलेल्या या अल्पवयीनांपैकी 46 जण जम्मू आणि श्रीनगरमधील सुधारगृहात होते. तर सुधारगृहात असणाऱ्या 25 जणांना जामीन मंजूर करून घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात श्रीनगरमधील 21 तर जम्मूमधील चार जणांचा समावेश आहे. सध्या सुधारगृहात श्रीनगरमध्ये 15 तर जम्मूमध्ये सहा जण आहेत. अशा 21 जणांची चौकशी प्रलंबीत आहे.
हा अहवाल जम्मू आणि काश्मिर उच्च न्यायलयाच्या बालन्यायिक समितीने हा अहवाल सर्वोच्च न्यायलयात सादर केला आहे. जम्मू काश्मिीर बाल संरक्षण समिती आणि पोलिस महासंचालक आणि उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तींनी यांनी सादर केलेल्या माहितीवर हा अहवाल आधारीत आहे. काश्मिरात 370 कलम रद्द केल्यानंतर बालकांना पोलिसांनी डांबून ठेवल्याच्या बातम्या देश विदेशातील माध्यमांत प्रसिध्द झाल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची न्यायिक समिती स्थापन केली होती.
कोणत्याही मुलाला पोलिसांनी बेकायदा ताब्यात घेतले नाही, अल्पवयीनांशी बाल न्याय कायद्यानुसारच वर्तणूक केली आहे. दगडफेक, दंगल आणि खासगी अथवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करताना पकडलेल्या अल्पवयीनांशी कायदेशीर प्रक्रियेनेच कारवाई केली, हे पोलिस प्रमुखांचे वाक्य या समितीने नमुद केले आहे.