नवी दिल्ली – कॉंग्रेसे नेत्या प्रियांका गांधी यांनी काश्मीर मधील निर्बंधांमुळे मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी म्हटले आहे की गेले दोन महिने काश्मीर ठप्प आहे, तेथील लॉकडाऊन स्थितीचा सर्वाधिक विपरीत परिणाम तेथील अल्पवयीन मुलांवर होत आहे. ही मुले गेले दोन महिने शाळेपासून दूर आहेत आणि त्यांच्या आप्तेष्ठांपासून आणि मित्रांपासूनही ही मुले दूर आहेत.
विकासाच्या गोष्ट करणारे सरकार मुलांनाच शाळेपासून दोन-दोन महिने दूर ठेवत असल्याचा प्रकार तुम्ही या आधी कधी पहायला आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याद्वारे भाजपचे सरकार नेमका काय संदेश देऊ इच्छित आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
काश्मीरात गेल्या 5 ऑक्टोबर पासून बंद पाळला गेला असून अनेक ठिकाणी अजूनही शाळा सुरू झालेल्या नाहीत. सरकारने इंटरनेट व मोबाईल कनेक्शन बंद ठेवले आहे.