मुंबई – देशाच्या इतिहासात करोनामुळे प्रथमच मंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे लवकरच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी करत भाजपाच्यावतीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.राज्यात भाजपा नेते आंदोलन करताना दिसत आहेत.
◆जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत
◆यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते..
◆”भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते..
एवढेच नाही..तर..1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
यावेळी राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. याच मुद्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! असं शेलार यांनी महाविकासआघाडी सरकार निशाणा साधला आहे.
हे नक्की वाचा : तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक, मग देव कुलुपबंद का? राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काय म्हणाले आशिष शेलार
जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत. यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले.त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते.
हे नक्की वाचा : ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’- मुख्यमंत्री
ते पुढे म्हणाले, एवढेच नाहीतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!” अशा शब्दांमध्ये ट्विट करून शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.