आळंदी – पंढरपूरमध्ये संचार बंदी असल्याने महाराज मंडळींनी गुरुवारी आळंदीतच प्रवचन, कीर्तन आणि भजनाचे आयोजन करून कार्तिकी वारी साजरी केली.
वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिकी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीसाठी राज्यासह देश-विदेशातून भाविक येत असतात. मात्र, यंदा करोनामुळे भाविकांना वारीकाळात पंढरपूरमध्ये येण्यास बंदी आहे. त्यामुळे संतांनी सांगितलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारच्या वाऱ्यांपैकी भाविकांनी वाचिक व मानसिक वारी केली.
वारीनिमित्त आळंदीत ह.भ.प. गणेश महाराज फड यांचे प्रवचन, ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन, तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आदिनाथजी सटले गुरुजी यांचे भजन झाले.
कीर्तन आणि प्रवचनातून महाराजांनी कार्तिकी वारीचे महत्त्व सांगितले.
यावेळी लक्ष्मण महाराज शेवाळे, संदीप म. लोहर, महादेव म. तौर, पांडुरंग म. शितोळे, सारंग म. क्षीरसागर, राजाराम म. टकले, संजय म.हिवराळे, महादेव म. आव्हाड, झाडे महाराज, आत्माराम शास्त्री, पखवाज वादक दासोपंत स्वामी, गव्हाणे म., प्रहलाद म. टकले, हरी महाराज, तुकाराम म.जाधव, अविनाश म. धनवे, काशिनाथ महाराज, गोपीनाथ महाराज उपस्थित होते.