1999 मध्ये भारताने पाकिस्तानवर कारगीलच्या युद्धात मिळवलेल्या विजया निमीत्त 26 जुलै हा कारगील दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या सोहळ्याचे औचित्य साधून बॉलिवूड सेलिब्रिटींनी कारगील युद्धात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली आहे. यासाठी एक थीम सॉंग तयार करण्यात आलं असून, यामध्ये बॉलिवूड मधील अनेक दिग्ज कलाकारांचा समावेश आहे. यावर्षी कारगीलवरील विजयाचा हा 20 वा विजय दिवस असणार आहे.
भारताने कारगील आणि सियाचिनच्या या दुर्गम पर्वत राजीत भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकाऊन लावताना मोठीच मुर्दुमकी गाजवली होती. आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन न करता भारतीय लष्कराने अत्यंत धैर्याने ही चढाई जिंकत पाकिस्तानी घुसखोरांना नेस्तानबूत केले होते.