कपूर घराण्याची वारसदार असणाऱ्या करिना कपूरने अलीकडेच चित्रपटातील कारकिर्दीची 20 वर्षे पूर्ण केली. दोन दशकांचा टप्पा चित्रपटक्षेत्रात पार करणे ही खूप मोठी उपलब्धी ठरते. कारण इथे पदोपदी अनिश्चितता पाहायला मिळते.
तसेच तुम्ही कितीही चांगले कलाकार असलात तरी प्रेक्षकांची तुम्हाला पसंती मिळेलच असे सांगता येत नाही आणि प्रेक्षकांनी पाठ फिरवली की निर्माते-दिग्दर्शकही अशा कलाकारांना काम देणे टाळतात आणि हळूहळू हे कलाकार गायब होतात. अशा अनिश्चिततेने भारलेल्या क्षेत्रात करिना दोन दशके कमी-अधिक फरकाने नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली.
या संपूर्ण प्रवासाचे श्रेय करिना आपल्या प्रशंसकांना, हितचिंतकांना देते. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रेमामुळेच मला आयुष्यभर काम करत राहायचे आहे, असेही सांगते. ‘ करिना सांगते, “माझी सिनेकारकीर्द अत्यंत उत्तम सुरू असून उलट आज मला जशा प्रकारचे चित्रपट करायचे होते तशा प्रकारचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे मला आयुष्यभर काम करत राहायचे आहे आणि ते अवघड असले तरी अशक्य नाही.
View this post on Instagram
दोन दशकांनंतरही विवाहित आणि एका मुलाची आई बनल्यानंतरही मला माझ्या चाहत्यांकडून जे प्रेम मिळत आहे ते पाहून मी स्तिमित होते. त्यातून मिळणारी ऊर्जाच मला पुढेही कार्यरत राखेल, असा विश्वास करीना व्यक्त करते. करिनाने गेल्या 20 वर्षांत “चमेली’, “अशोका’, “ऐतराज’, “जब वी मेट’, “ओमकारा’, यांसारख्या चित्रपटातून दमदार भूमिका केल्या.
View this post on Instagram
Whats your 2020 Plan ? ❤️ . . . . GoodNewwz In cinemas ! Book your tickets now! Link in bio. ?
“देव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला समीक्षकांकडून सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कारही मिळाला होता. आता दोन दशकांनंतर करिनाची कारकीर्द कशा प्रकारे पुढे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.