मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि करण जोहर हे खूप दिवसांपासून चांगले मित्र आहेत. दोघांनीही एकत्र अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तशीच दोघांमध्ये भांडणे देखील भरपूर झाली आहेत. एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी शाहरुख करणला इतकं वाईट बोलला होता कि यामुळे करणला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते. स्वतः करण जोहरने याबाबतचे सत्य सांगितले.
2003 साली प्रदर्शित झालेल्या कल हो ना हो या चित्रपटात शाहरुखसोबत सैफ अली खान आणि प्रीती झिंटाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान किंग खान करणवर भडकला होता. यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. शाहरुखने केलेल्या बडबडीमुळे करण इतका व्यथित झाला होता कि त्याला अक्षरशः रडू कोसळलं.
‘कल हो ना हो’च्या शूटिंग दरम्यान, चित्रपटातील सहकलाकार प्रीती आणि सैफ वारंवार त्यांचे संवाद विसरत होते. तास दोन तास वायला गेल्यानंतर शाहरुखचा राग अनावर झाला आणि त्याने सर्व राग करण जोहरवर काढला. याचा खुलासा खुद्द करणने एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये केला होता.
करणने सांगितले की, “शाहरुख माझ्यावरच भडकून म्हणाला,तूच सर्वांचे लाड करून ठेवलेत.. इथं काय जोक सुरु आहे का ? कोणीच आपलं काम नीट करत नाहीये असं म्हणून शाहरुखने करणला शिवीगाळ देखील केली. शाहरुखचा वाढलेला पार पाहून नवख्या करणला ते सहन झालं नाही आणि तो रडू लागला. मात्र ही बाब शाहरुखच्या लक्षात येताच त्याने करणला सर्वांपासून दूर ननेऊन समजावलं आणि त्याचा राग शांत केला.
या चित्रपटासाठी प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरला. दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या या पदार्पणाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.