मुंबई – कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोचा 7वा सीझन सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शोचा होस्ट करण जोहर दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफवर नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. या दोन्ही अभिनेत्रींवरील करणच्या रागाचे कारणही समोर आले आहे. दीपिका आणि कतरिनावरील नाराजीचा बदला घेण्यासाठी करण लग्न करणार असल्याची चर्चा देखील सध्या रंगू लागली आहे.
करण जोहर ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोचा ७वा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये तो सर्व सेलिब्रिटींशी बोलतो. यादरम्यान सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे होत आहेत. दरम्यान, करण जोहरने आपण लग्न करण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला आहे. बदला घेण्यासाठी त्याला लग्न करायचे आहे, असेही त्याने शोमध्ये सांगितले.
आपल्या लग्नात करण त्यांना बोलावणार नाही ज्यांनी स्वतःच्या लग्नातील एकाही कार्यक्रमात करणला बोलावले नव्हते. यावेळी करणने कोणत्याही अभिनेत्रींचे नाव घेतलेले नाही परंतु त्याची नाराजी दीपिका आणि कतरीना सोबत असल्याची सध्या सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे.
दीपिका पदुकोणने 2018 मध्ये इटलीमध्ये तर कतरिना कैफने 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले होते. या दोन्ही लग्नात करण जोहरला आमंत्रित करण्यात आले नव्हते. लग्नाला फक्त जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.म्हणून बदला घेण्यासाठी करणने असे विधान केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.