नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘कपिल देव’ यांनी आज क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) च्या क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला आहे. कपिल देव यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळविला आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती.
दरम्यान, बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी कपिल देव यांना नोटीस पाठवली होती. या समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा देखील समावेश होता.