मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राजद्रोहाचा आरोप लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरुद्ध येत्या २५ तारखेपर्यंत कोणतंही कठोर पाऊल उचलू नये, असे निर्देशही न्यायालयानं दिले.
आपल्याविरुद्धचा एफआयआर आणि १७ ऑक्टोबर २०२० ला दंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करावा, अशी याचिका कंगना आणि तिच्या बहीणनं उच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. २५ जानेवारीपर्यंत या दोघींना चौकशीसाठी बोलावू नये, असे निर्देशही न्यायालयानं पोलीसांना दिले.