मुंबई : पाकव्याप्त काश्मीरसोबत मुंबईची तुलना केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या आयटी सेलने कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही केली आहे.
शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”, असे या तक्रारीत म्हटले असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
Maharashtra: Shiv Sena IT Cell files a complaint at Shrinagar Police Station in Thane against Kangana Ranaut seeking FIR against her under 'charges of sedition for her Pakistan occupied Kashmir (PoK) analogy for Mumbai'. pic.twitter.com/wiiFkWBIFm
— ANI (@ANI) September 8, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. त्यातच संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ म्हटल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे दिसून येत आहे.