मुंबई – बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत आपल्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. फॅशनसोबतच कंगना आपल्या कामाच्याबाबत नेहमीच सिरिअस असते. कंगना सध्या आपल्या अपकमिंग ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. अश्यातच आता कंगनाने तिच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली असून, या संदर्भातील एक पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री कंगना बहुचर्चित “चंद्रमुखी’ या तमिळ चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये झळकणार आहे.
चंद्रमुखी हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला असून, यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका सरवनन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर, 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आप्तमित्र’ या चित्रपटाचा चंद्रमुखी हा रिमेक होता. तर आप्तमित्र हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मणिचित्राथजु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. आणि आता पुन्हा एकदा याच चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील बहुचर्चित “चंद्रमुखी’ चित्रपटाचा रिमेक करण्यात आला होता. “भूल भूलैय्या’ असं या चित्रपटाचं असून, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यामध्ये मुख्य भूमिकेत झळकले होते. तर, नुकतंच “भूल भूलैय्या’ या चित्रपटाचा आधार घेऊन ‘भूल भूलैय्या -2’ हा चित्रपट तयार करण्यात आला होता. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसून आला होता.
मात्र, असं असले तरी आता ‘चंद्रमुखी-2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत प्रमुख भूमिका साकारणार आहे. अभिनेत आणि चित्रपट निर्माता राघव लॉरेंस यांनी ‘चंद्रमुखी-2’ या आगामी चित्रपटाबाबत एक ट्वीट केले होते.
या ट्वीटमध्ये ते अभिनेते रजनीकांत यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. ‘रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन आज म्हैसूरमध्ये चंद्रमुखी 2 च्या शूटिंगला सुरुवात करत आहे.’ असं पोस्टमध्ये राघव लॉरेंस यांनी लिहिलं. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.