मुंबई – कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांनी देखील हा निर्णय योग्यच असून, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रनौत’ हिने सुद्धा भारत-चीन मध्ये सुरु असलेल्या तणावावर आपले मत व्यक्त मांडले आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कंगना म्हणाली…
View this post on Instagram
“We have to stand together, unite, and collectively fight this war against China!” #अब_चीनी_बंद
जर कोणी हातापासून तुमची बोटे वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या हातापासून तळवा वेगळा करण्याचा प्रयत्न करत असेल किती त्रास होईल. तोच त्रास चीनने आपल्याला दिला आहे. पुढे कंगना म्हणाली, सीमेवर सैन्यांमध्ये जे युद्ध होते त्यात केवळ सेनेचे आणि सरकारचे असते. त्यात आपला काही हक्क नाही, सहभाग नाही, असे बोलणे कितपत योग्य आहे. कारण लडाख हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे.
आपल्या सर्वांना आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. मी त्यासाठी आग्रही आहे. सर्व चीनी वस्तूंवर, उत्पादनांवर आणि कंपन्यावर बहिष्कार घालायला हवा. भारताकडून मिळणाऱ्या रेव्ह्युन्यू तून ते आपल्या सैनिकांना मारण्यासाठी हत्यारं खरेदी करतात. म्हणून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून आत्मनिर्भर होण्याची प्रतिज्ञा करुया. असं कंगना म्हणाली.