नवी दिल्ली – बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री ‘कंगना रणावत’ तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती ट्रोल देखील होते. काही दिवसांपूर्वी कंगनाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली असून, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले आहे. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर दुःख आणि लज्जास्पद असल्याचे म्हंटले होते.
दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे.
शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच कंगना कडून वेळोवेळी समुदाया बद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला जात आहे. असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.
तीन कृषी कायद्या बद्दल कंगना काय म्हणाली….
“तीन कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल नाराजी आणि निराशा व्यक्त करत कंगनाने लिहिले की, दुःखद, लज्जास्पद आणि चुकीचे…संसदेत बसून सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे करू लागले तर हाही जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन..!’ अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.