मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता विकास बेहेल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर काल (दि. ३) प्राप्तिकर विभागानं धाड टाकली. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल २२ ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे. या मुद्यावरून कंगना राणावतने पुन्हा एकदा ट्विट करत तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांना दहशतवादी म्हणत टीका केली आहे.
IT department claims data from their phones has been wiped off, money laundering numbers and involvement of stakeholders can be shocking,I had my suspicions when I saw them provoke migrant labourers with some high budget anti India animation advertisements https://t.co/kjd8oJVmPv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 5, 2021
काय म्हणाली कंगना राणावत
‘मला फार पूर्वीपासून माहिती होते की, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील हे लोक राष्ट्रविरोधी जाहिराती करुन मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न करत होती. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये यांच्या सारखे अनेक दहशतवादी भरले आहेत. तसेच आपल्या पैशांचा वापर करुन भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने यांच्या विरोधात कसून कारवाई करून अशा लहान माशांना चांगलाच धडा शिकवायला हवा.’