मुंबई – आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही.
मात्र प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या मनात विठूमाऊली आणि रखुमाईची मुर्ती कोरली गेली आहे. त्यामुळे आज हे भक्त करोना संकटामुळे जरी घरी असले तरी विठ्ठल भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विठ्ठलाची अशी काही खास गाणी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जी ऐकल्यानंतर थेट पंढरपूरात असल्याची जाणीव तुम्हाला होईल…
माझे माहेर पांढरी…
जगी जीवनाचे सार…
विठू माउली तू…
विठ्ठलाच्या पायी वीट…
कानडा राजा पंढरीचा…