नवी दिल्ली – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. पश्चिम बंगाल येथे भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावून देखील येथे पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसलाच जनतेने सत्तेच्या चाव्या बहुमतासह सोपवल्या असल्याचं चित्र दिसतंय. पश्चिम बंगाल येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा प्रमुख सामना पाहायला मिळाला.
निवडणुकांआधी तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती, भाजपने प्रचारसभांमध्ये झोकून दिलेली ताकद यांमुळे ही निवडणूक तृणमूलला जड जाईल असे अंदाज बांधण्यात येत होते. मात्र, बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांनाच संपूर्ण बहुमत दिल्याने हे अंदाज सपशेल खोटे ठरले. दरम्यान, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याने अनेक नेत्यांनी आता भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
अशातच, सिनेकलाकार कमाल आर खान यांनी बंगाल निवडणुकांतील पराभवावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर एक ट्विट केलंय. यामध्ये त्यांनी, “मला असं वाटतंय की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन लागू करतील. कारण पराभवाचा राग कोठेतरी काढतीलच ना.” अशी फिरकी घेतली आहे.
Mujhe Lagta Hai Ab Modi Ji Saare Desh Main #lockdown Laga Denge! Kyonki Haar Ka Gussa Kahin Toh Nikalenge!😭
— KRK (@kamaalrkhan) May 2, 2021