पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील शेतीला वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती सद्या निर्माण झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सद्या सत्तेवर आल्यामुळे सातगाव पठाराचा पाणी प्रश्न सुटण्याचे सूतोवाच मिळाले. मुळात म्हणजे हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्तीच नाही, तर ह्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाने मिळणाऱ्या श्रेयवादामुळेही अडचणीत आला होता, आता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षांचे एकत्रित सरकार आहे. त्यामुळे कुठलाच पक्ष आपली जबाबदारी झटकू शकत नाही.
गरज आहे फक्त सातगाव पठारावरील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली मागणी मांडण्याची. खेड तालुक्यातील नेते मंडळीनी पाण्यावर पहिला हक्क हा खेड तालुक्याचा आहे अशी अनेकवेळा वक्तव्ये केलेली आहेत. पाणी पठारावर आण्यासाठी लिफ्टच्या माध्यमातून वेळ नदीत पडणार असून हा विजबिलाचा खर्च किवा तत्सम अन्य खर्च दिर्घकाळ पठारावरील शेतकऱ्यांना परवडणारे आहे का याचाही विचार होणे गरजेचे आहे.
जमिनीवरील शिक्के उठवण्याची मागणी
पाणी वेळ नदीच्या पात्रा मधून पुर्व पटट्यातील शिरूर मधील गावांना तसेच पाणी खेड तालुक्यातील काही गावांना ही मिळणार असेल तर सिंलीग फक्त सातगाव पठारावरच का? तसेच साधारण पणे पचवीस वर्षी पुर्वी पडलेले सिंलीगचे शिक्के आणि अनेक कुटुंबातील रखडलेले शेती वाटप या मुळे काही शेतकऱ्यांना हा प्रकल्प नुकसानकारक ठरणार आहे. त्यामुळे त्वरित सिंलीग हटवावे अशी मागणी सिंलीगग्रस्थ शेतकऱ्यांनी केली आहे.