मुंबई – देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम नुतकाच जाहीर करण्यात आला. त्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून काम करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसहनेही पाच पैकी तीन राज्यांमधील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
ज्यांचे खासदार सहाच्यावर निवडून येत नाही, तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात हे लॉजिक मला समजत नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी आमदार निवडून आले. त्यापेक्षा कमी आमदार शिवसेनेचे होते. राज्यात शिवसेनेचे कमी संख्याबळ असताना त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले. आता ते शिवसेनेला गोव्यात निवडणूक लढा असे म्हणत उकसावत आहे. तेथेही आपली सत्ता येईल का?याचे शरद पवार गणित जुळवत आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.