पोलीस प्रशासनाची माहिती : इतर जिल्हा तसेच राज्यात जाण्यासाठी बंधनकारकच
पुणे – एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आणि दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नागरिकांनी ई-पास काढणे गरजेचे आहे. राज्य शासनानेअद्यापपर्यंत कोणत्यानी सूचना नव्याने दिलेल्या नसल्याने ई-पासची मुदत वाढविल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये. महत्त्वाच्या कामासाठीच घरातून बाहेर निघावे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात जाण्यासाठीही पास काढावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केले आहे. जिम, योगा केंद्र सुरू सुरू करण्यात आले असून दुचाकीवरून दोघांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनेही सर्वसामान्य नागरिकांवर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मात्र, ई-पासबाबत नवीन कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत न आल्याने जुनी पद्धतीच सुरू राहणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांत व अन्य राज्यांत जाणे सोपे व्हावे, यासाठी पोलिसांकडून डिजिटल पासची सुविधा देण्यात आली होती. लॉकडाऊन जसजसा वाढेल तसतसे डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात आली होती. संचार मनाई आदेशाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरिकांची अन्य जिल्ह्यात व राज्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
ई-पास गरजेचा असल्याचे स्पष्ट करून बच्चन सिंग म्हणाले की, नागरिकांना ऑगस्ट महिन्यांपासून प्रवासासाठी डिजिटल पास देण्याबाबत अद्याप राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
http://www.punepolice.in नागरिकांना ई-पास मिळू शकतो.