नवी दिल्ली – ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सरस कामगिरी केलेल्या खेळाडूंबरोबरच आता देशातील ज्युनिअर गटातील खेळाडूंचाही समावेश टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेत समावेश केला जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी स्पष्ट केले आहे.
2004 पासून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकली आहेत. आता यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलली गेली असली तरीही त्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे सराव सुरू झाले आहेत. आता आमचे प्रमुख लक्ष्य ज्युनिअर खेळाडूंवर आहे. देशाच्या युवा खेळाडूंमध्ये देखील अफाट गुणवत्ता आहे. त्यांना जर योग्य वयात व वेळेत टॉप योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे, असे रिजीजू यांनी सांगितले.