मुंबई – अमिताभ बच्चन आणि जॉनी डेप हे दिग्गज अभिनेते जर एकत्र एखाद्या चित्रपटात दिसणार असतील तर त्यांना सोबत पाहणं कोणाला आवडणार नाही. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन दिग्दर्शक मीरा नायर यांनी प्रयत्न सुरु केले होते. सलाम बॉंम्बे,मान्सून वेडिंग,कामसूत्र असे प्रसिद्ध चित्रपट दिल्यानंतर मीरा नायर यांनी अमिताभ आणि जॉनीलासोबत आणण्यासाठी आपला ड्रीम प्रोजेक्ट सुरु केला होता.
मीरा नायर यांनी आजपर्यंत आगळा वेगळा विषय घेऊन चित्रपट बनवले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सर्व चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जातात. असाच एक प्रोजेक्ट म्हणजे ‘शांताराम’. या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी मीरा खूप उत्सुक होत्या. एका कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. ही कादंबरी ऑस्ट्रेलिया आणि भारतात खूप प्रसिद्ध झाली. त्यात एका बँक दरोडेखोराची कथा सांगितली आहे. हा दरोडेखोर पकडला जातो पण तो चकमा देऊन पळून जातो आणि अनेक ठिकाणांहून मुंबई गाठतो. यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडतात.
या चित्रपटासाठी मीराची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्याने जॉनी डेपला मुख्य पात्र म्हणजेच लुटारूच्या भूमिकेत फायनल केले होते. त्याचवेळी दरोडेखोराला मुंबईत एक मित्र मिळतो. या मित्राच्या भूमिकेसाठी अमिताभ यांना फायनल करण्यात आले. जॉनीने या चित्रपटासाठी आनंदाने होकार दिला. तोही मीरासोबत काम करण्यास उत्सुक होता. चित्रपट सुरू करण्यासाठी जानेवारी 2008 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
अचानक हॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर्सचा संप सुरु झाला. यानंतर या प्रोजेक्टला खूप उशीर झाला. जॉनी देखील आपल्या इतर चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बीजी होता. अमिताभ हे देखील आपल्या कामामध्ये व्यस्त झाले होते. यातून हा चित्रपट रखडला आणि पुन्हा याबाबतचे कोणतेही अपडेट मिळू शकले नाही. मीरा नायर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात होते. आतापर्यंत या चित्रपटाचे रद्द होण्याचे खरे कारण समोर आलेली नाही.