दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आणि डाव्या पक्षांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री जावडेकर यांनी ट्विट केले की, काल रात्री जेएनयूमधील हिंसाचाराचा मी निषेध करतो. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आणि डावे पक्षांचे काही घटक जाणीवपूर्वक देशात, विशेषत: विद्यापीठांमध्ये हिंसा आणि अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही तोंड बांधून आलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांवर हल्ला चढवून मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जावडेकर यांनी हल्ल्याच्या वेळी काही नेत्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिंसारावेळी नेत्यांचा हे कारस्थान असल्याचे म्हंटले आहे.
“हिंसाचारानंतर 10 मिनिटांत योगेंद्र यादव घटनास्थळी कसे पोहोचले,” असा आरोप त्यांनी केला. याचा विचार केला पाहिजे. हे षडयंत्र आहे. ”गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सेमेस्टर नोंदणी प्रक्रियेमध्ये कोण अडथळा आणत आहे हे शोधून काढावे लागेल, असेही जावडेकर म्हणाले.
ते म्हणाले, “काल बाहेरच्यांनी येऊन विद्यार्थी, शिक्षकांवर हल्ला केला. याची चौकशी झाली पाहिजे. अमित शहा यांनी पोलिसांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही जवाहरलाल नेहरू विद्यापीठावरील हल्ल्याचा निषेध केला
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचा निषेध करत म्हटले आहे की, चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर आल्यास या प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली जाईल.