नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी झालेल्या हल्ल्यात गृहमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच जेएनयू हिंसाचाराला मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
जयराम रमेश यांनी हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना तात्काळ पदावरून हटवावे असेही ते म्हणाले.
जेएनयूच्या घटनेमागे मानव संसाधन विकास मंत्री आणि गृहमंत्री दोघेही सामील आहेत. ही अधिकृतपणे भाजपची गुंडागर्दी आहे. 72 तास झाल्यानंतरही आरोपीना अटक का नाही ? ज्या आरोपींची ओळख पटली आहे त्यांना अटक करा अशी मागणी केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्याचा विचार करून कुलगुरूंना पदावरून हटवावे असे ते म्हणाले.