मुंबई- केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरूवात नव्या शैक्षणिक धोरणावरील वादापासून झाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषा बंधनकारक करण्याच्या प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीवरून सध्या चांगलाच वाद उफाळला आहे.
त्यातच महाराष्ट्रातून देखील या मुद्याला विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी देखील या मुद्यावर आपली भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, आम्ही सगळ्या भाषा शिकू पण हिंदी ची सक्ती मान्य नाही” असं ट्विट आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.
महाराष्ट्राची मातृभाषा #मराठी आहे
आम्ही भाषा सगळ्या शिकू पण #हिंदी ची सक्ती मान्य नाही
सहन करणार नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 3, 2019