मुंबई – कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा दिवस रात्र काम करत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला असून आज त्याचा ९ वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी, ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे.
जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे… @PMOIndia @CMOMaharashtra#अंधेरी_रात_में_दिया_तेरे_हाथ_में pic.twitter.com/IiP2il0YMJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींच्या याच आवाहनावर आता टीकेची झोड उठली आहे.अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत बोलतानाचा आपला एक व्हिडिओ ट्विट केला असून ते म्हणतात,’जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे…’ या ट्विट बरोबरच त्यांनी #अंधेरी_रात_में_दिया_तेरे_हाथ_में या हॅशटॅगचा वापर केला असून @PMOIndia @CMOMaharashtra ला टॅगसुद्धा केले आहे.