रांची : नरेंद्र मोदींनी झारखंड निवडणुकीसाठी ९ जाहिरात सभा घेतल्या. त्या प्रभागात 33 जागा आहेत. त्यापैकी भाजपला २२ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोदी, शहा यांनी राष्ट्रीय मुद्दे उपस्थित केले. राम मंदिर, नागरिकता दुरुस्ती कायदा, एनआरसी सारखे मुद्दे जनतेसमोर मांडले. परंतु त्यांना जनतेने नाकारला.
मोदींनी ज्या ९ सभा घेतल्या त्यापैकी ७ जगावर भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने फक्त डाल्टनगंज आणि खूंटी येथे विजय मिळविला आहे, तर उर्वरित गुमला, बारही, बोकारो, दुमका, बारहेत आणि जमशेदपूर पूर्वत भाजपचा पराभव झाला आहे.
गेल्या काही वर्षात मोदींची प्रतिमा उत्तम वक्ते आणि जनतेचे नेते म्हणून केली जाते. पण झारखंडमध्ये मोदींना जनतेने नाकारले आहे. नरेंद्र मोदी यांची जादू विविध राज्यात कमी होते आहे.