मुंबई – आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग प्रकरणात अडकवण्यात आले होते आणि हे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीच समोर आणले होते त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर खोटी कारवाई केंद्र सरकारने केली आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
मलिकांवरील कारवाईच्या बाबतीत सर्व बाबी न्यायालयातील सुनावणीनंतर स्पष्ट होतील असेही त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांनी सर्व पुराव्यांसहित आर्यन खान याला एनसीबीकडून खोटे अडकवले गेले असल्याचे निदर्शनाला आणले होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल ते म्हणाले, मी काही वेळापूर्वी ट्विट करून संबंधित अधिकाऱ्यांना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची विनंती केली होती, परंतु ते यूपी निवडणुकीत व्यस्त आहेत त्यामुळे ते विसरले असावेत.