मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला २२ वा वर्धापण दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने एका मुलाखतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत व्यक्त केली आहे.
जयंत पाटिल म्हणाले की, “राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक असतं. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं”.यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ साली स्थापन झाल्यानंतर लगेचच पक्ष सत्तेत आला होता आणि अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पक्षातील मंत्र्यांवर पडल्या होत्या. सरकाची आर्थिक अवस्था संकटात होती. राज्य आर्थिक सक्षम करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही राज्य दुरुस्त करण्यात यश मिळवलं. राज्यातील जलसिंचन, ऊर्जा तसंच अशा अनेक अनेक विभागात सुधारणा करण्यात राष्ट्रवादीचं योगदान आहे. महाराष्ट्रात २०१४ च्या आधी १५ वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली त्याच आमचा सिंहाचा वाटा होता,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीची पुढिल वाटचाल कशी असणार यावर पाटील म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आमची ताकद कशी वाढेल, जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी भविष्यात प्रयत्न असेल. तसंच महाराष्ट्रातील जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार असणं गरजेचं आहे, त्यासाठी पक्ष सर्व जिल्ह्यांमध्ये अधिक कार्यक्षम आणि पक्ष सर्वोत्तम कसा होईल यासाठी प्रयत्न असेल. हे एक आव्हान असून त्यासाठी महाराष्ट्रभर ताकदीने काम करत आहोत.
दरम्यान, पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीचा प्रतिमेवर परिणाम झाल्याचे म्हणाले आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे.तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीवर भाष्य केले आहे.