मुंबई | केंद्रीय सत्तेचा गैरवापर देशात सुरू आहे. क्रूझ ड्रग पार्टी आणि एनसीबी या केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. बरं झालं लोकांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागलीय, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.
भाजपाप्रणित केंद्र सरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय, हे आज टीव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे, असे ते म्हणाले.
आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली, त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.