श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली . या चकमकीत जवान कृष्ण वैद्य यांना वीरमरण आले आहे.
Sepoy Krishna Vaidya lost his life during operations on 23rd July 2021 at Krishna Ghati Sector, Jammu and Kashmir: 16 Corps, Indian Army pic.twitter.com/39cVvUIQJ1
— ANI (@ANI) July 24, 2021
या बाबत एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या विरोधात धडक आणि महत्वपूर्ण मोहीम राबवविण्यात येत आहे. या दरम्यान 23 जुलै रोजी भारतीय सैन्य दलाची एक तुकडी सर्च ऑपरेशन करत असताना कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.